Tag: marathi news

‘रंगीले फंटर’ शाळकरी जीवनातली धमाल गोष्ट, ३ नोव्हेंबरला येणार भेटीला

शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट 'रंगीले फंटर' या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ च्या माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबवणार – आदिती तटकरे

राज्यातील सर्व जिल्ह्यातील शक्ती गटांना आणि महिला बचत गटांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणे, विविध योजनांसाठी त्यांची पात्रता तपासून प्रस्तावित लाभार्थी महिलांची यादी तयार करणे, योजनांचे लाभ घेण्यासाठी संबंधितांकडून…

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात शासन नियमांचे व कायद्यांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता परवानगी देण्याची कार्यवाही सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायती यांनी करावी…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पवार तर शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पवार तर शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची आज नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्रे पक्ष कार्यालयात देण्यात आली.

ट्रिपल इंजिन सरकारला राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची बुद्धी कधी येणार ?- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

गणेशोत्सवासाठी पहिली कोकण ट्रेन उद्यापासून ,नितेश राणेंनी केले ट्विट

यंदाही भाविकांची गर्दी लक्षात घेत भाजपकडून तब्बल 6 जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती नितेश राणे यांनी ट्विट करुन दिली आहे.

गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी मुंबई भाजपा सज्ज!आशिष शेलार यांनी केली स्पर्धेची घोषणा

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे अभियानाचा शुभारंभ

राज्यात वरिष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. सन 2031 पर्यंत वरिष्ठ नागरिकांची संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या 15 टक्के इतकी असेल, असे सांगून शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये वरिष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र वॉर्ड…

भाजपा सरकारला मराठा, ओबीसी, धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो, एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देतो, आरक्षण देण्याची धमक फक्त फडणवीसमध्येच आहे अशा वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या त्याचे काय झाले हे…

भाजपा सरकारने गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे पाप केलंय- नाना पटोले

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. केंद्रात व राज्यातील भाजपा सरकार सर्वसामान्य जनता व गरिबांच्या हिताचे नाही.