फोटो प्रातिनिधीक आहेफोटो प्रातिनिधीक आहे

Navi Mumbai तील तुर्भे भागात एक धक्कादायक असा प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलांच्या गटाकडून एका अल्पवयीन मुलाची हत्या झाली आहे. त्यामुळे या भागात दहशत पसरली आहे. या हत्येमागे नेमकं कारण काय याचा पोलीस अधिक तपास घेत आहे. त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु ज्या दोन गटामध्ये हा वाद झाला त्यातील एका गटातील मुलांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. नेमकं प्रकरण काय चला घेऊया जाणून

Abhishek Ghosalkar | मॉरिसच्या बॉडीगार्डचा जामीन फेटाळला

Navi Mumbai अल्पवयीन मुलांनी केली हत्या

सदर सगळा प्रकार तुर्भे येथील सामंत विद्यालयासमोर घडला आहे. आदित्य भोसले( 17) आणि देवांग ठाकूर ( 17) हे दोेघेही या शाळेच्या परिसरात गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या काही मुलांसोबत त्यांचा वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर काहीच वेळात एका मोठ्या भांडणाने घेतले. लाथा बुक्क्याने ही मुलं एकमेकांना मारत होती. अचानक त्यांनी लोखंडाच्या सळ्या आणल्या आणि त्याने मारायला सुरुवात केली. यात आदित्य भोसे आणि देवांग ठाकूर चांगलेच जखमी झाले होते. या दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यात आदित्य भोसले याचा मृत्यू झाला. तर देवांगवर सध्या उपचार सुरु आहेत.

इतक्या लहान वयात या मुलांमध्ये इतकी हिंसवृत्ती असणे ही खरंच चिंताजनक बाब आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. यामागील नेमके कारण काय याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *