जे भारतीय मुस्लीम आहेत ते देशाचे नागरीक आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे प्रशासनाकडून मिळतात. असे असताना अब्दूर रहमान नेमकं कोणत्या मुसलमानांना आधार कार्ड, वोटिंग आयडी बनवून घेऊन इथं राहा असं म्हणत आहेत? असा प्रश्न आमदार गोपींचद पडाळकर यांनी उपस्थित केला आहे.
अब्दुर रहमान यांनी मुस्लिम समुदायाला आवाहन करताना तुम्ही सर्वात आधी तुमचे मतदान कार्ड व्यवस्थित बनवा. आजच जाऊन आधार कार्ड, मतदान कार्ड आणि अन्य कागदपत्रे व्यवस्थित बनवा. जर एखादा दलित, मुस्लीम घर बदलतो तेव्हा त्याचे नाव यादीतून काढले जाते. तुम्ही जिथे जाता तिथे सर्वात आधी मतदान कार्डात नाव टाका, मतदार यादीत पुरुषाला महिला दाखवले जाते, फोटो बदलले जातात असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की,देशात पहिले टार्गेट मुस्लिम, दुसरे टार्गेट दलित, तिसरे आदिवासी, चौथे ओबीसी, पाचवा गरीब आणि अखेर मनुस्मृती देशात लागू करणे सर्वांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाईल असा आरोप करत अब्दूर रहमान यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.