नागरिकांना योग्य आणि मोफत उपचार मिळावा यासाठी शासनाने एक उत्तमनिर्णय घेतला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून शासकीय रुग्णालयात मोफत उपचार दिला जाणार आहे. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही तपासणीसाठी आणि वैद्यकीय सेवेसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला आहे.
कळवा येथील रुग्णालयात एकाच दिवशी १६ रुग्णांचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितले कारण
राज्यघटनेच्या २१ व्या कलमानुसार प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार हा मुलभूत अधिकार म्हणून प्रदान करण्यात आलेला आहे. राज्यातील नागरिकांना विनाविलंब, नि:शुल्क,दर्जेदार,सहज व विनाविलंब वैद्यकिय सेवा देण्यासाठी राज्य शासन काम करत आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयातून नि:शुल्क उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाकडून जनतेसाठी ‘आयुष्मान भारत योजना’ व ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेतंर्गत 5 लाख रूपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी शासनाने यापूर्वीच घेतली आहे. या योजनांमधून राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्य खर्चाचे कवच शासनाने उपलबध करून दिले आहे. राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त व रक्त घटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क वगळून शासकीय रूग्णालयांमधून करण्यात येणाऱ्या तपासण्या व उपचार, तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा नि:शुल्क करण्यात येणार आहेत.
आता नि:शुल्क उपचारपद्धतीमुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे यात काही शंका नाही.