Category: बातम्या

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत होणाऱ्या १४१ व्या सत्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन

मुंबईत येत्या 14 ऑक्टोबर 2023 रोजी, जियो वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्राचे आयोजन होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सत्राचे उद्‌घाटन करणार आहेत. हे सत्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक  समितीच्या…

सार्वजनिक गणेशोत्सव हे छत्रपती शिवरायांचे विचार, कार्य पुढे नेण्याचे उत्तम माध्यम – सुधीर मुनगंटीवार

सार्वजनिक गणेशोत्सव हे छत्रपती शिवरायांचे कार्य व विचार पुढे नेण्याचे उत्तम माध्यम आहे. एकविसाव्या शतकात सार्वजनिक गणेशोत्सवाचे अधिक महत्व आहे. त्यामुळे हा उत्सव अधिकाधिक वैचारिक प्रबोधन करणारा व समाजाभिमुख व्हावा…

राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

वांद्रे शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीमध्ये उपलब्ध असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जागेची क्षमता तपासून त्याठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करुन सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नवरात्री उत्सवासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे ‘मंगलमय धोरण’

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांची संयुक्त बैठक पार पडली. सदर बैठकीत या दोन्ही…

वाघनखांवर शंका घेणाऱ्यांसाठी आशिष शेलारांचे उत्तर, केले कार्यक्रमाचे आयोजन

नोव्हेंबरमध्ये वाघनखे तीन वर्षांसाठी येणार आहेत. मुंबई, नागपूर, सोलापूर सातारा, पुणे या महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये या शौर्य पराक्रमी वाघनखे जनतेसाठी खुली असतील

विद्यार्थी वसतिगृह तातडीने सुरू करण्याचे आदेश-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना बसणार शुल्क वाढीचा भुर्दंड

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा झालेल्या जून - जुलैच्या पुरवणी परीक्षेपासून दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे.

‘उडता पंजाब’ सारखा ‘उडता महाराष्ट्र’ होऊ देऊ नका!, नाशिकमध्ये अमली पदार्थांचे साठे सापडल्यानंतर तांबे यांचा इशारा

'उडता पंजाब' सारखा 'उडता महाराष्ट्र' होऊ देऊ नका, असं आवाहन करत राज्यभरात पोलिसांनी भरारी पथकं तयार करून शाळांबाहेरील या अशा छोट्या टपऱ्या व दुकानांवर नजर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी या…

सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश !

सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित म्हणून शासनाने आता राज्यातील सोयाबीनच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारचे मदत व पुनर्वसन विभागाचे आदेश सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी निर्गमित झाले आहेत.